गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईल स्क्रीनपासून ठेवा दूर

वार्षिक परीक्षा संपल्या आहेत. मुलांना उन्हाळी सुट्टी लागली आहे. प्रत्यक्षात मुलांचा स्क्रीन टाइम संपवावा व त्यांना वाचन लेखनाकडे पुन्हा वळवावे, असे प्रयत्न शाळा आणि कुटुंब स्तरावर व्हायला हवे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून चालवण्याचा प्रयत्न होत आहे.  त्यामुळे सुट्टीत मोबाईल व टीव्हीची डीटॅचमेंट देणारे उपक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत. सुटीभर मुलांनी मोबाईल आणि टोव्ही स्क्रीनमुक्‍त राहावे, यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. एकतर मुले टीव्ही व मोबाईलमध्ये गुंतून पडतात. शाळा व अभ्यास नसल्याने पालकांना देखील मुलांना काय सांगावे, असा प्रश्‍न पडतो. तसेच मुले स्वतः तर टीव्ही व मोबाईलमध्ये गुंतून पडतात. पालक त्यांच्या आवडीचे कार्यक्रम पाहत असतील तर ते देखील पाहतात. शाळा नसल्याने पालक त्यांना टाळून टीव्ही पाहू शकत नाहीत. म्हणजे उन्हाळी सुटीत या मुलांचा स्क्रीन टाइम वाढतो आहे. मुलांना उत्तम प्रकारची उन्हाळी सुटी घालवण्यासाठी छंद वर्ग, शिबिरे, खेळ प्रशिक्षणे, कला वर्गांची गरज आहे. यामध्ये मुलांनी आवर्जून सहभागी व्हायला पाहिजे. विभक्त कुटुंबात मन लहान केल्याने नाती आक्रसतात. पण सुटीत नातेवाइकांकडे मुले पाठवली तर ते त्या कुटुंबाशी समरस होण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना परिस्थितीशी तडजोड करण्याची सवय लागते. पण अति लाडाने पालक हे करायला तयार होत नाहीत. त्यामुळे नातीगोत्याचे संबंध मुलाने सुटीसाठी उपयोगी ठरतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली