शनिवार, ९ एप्रिल, २०२२

इच्छा आणि मार्ग


कोरोना महामारीमुळे जगाची चिंता वाढवली. सुखवस्तू जीवन जगणाऱ्यालादेखील कोरोनाने काळजी करायला भाग पाडलं. जीवन क्षणभंगुर आहे,याचा अनेकांना साक्षात्कार झाला. कोरोनामुळे माणसाची चिंता पहिल्यापेक्षा अनेक पटीने वाढली. अजूनही काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे.सध्या चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेला कोरोना आपल्याकडे कधी येईल,याचा नेम नाही. म्हणजे चिंता संपलेली नाही. मात्र एक गोष्टी घडली आहे. त्याची भीती कमी झाली आहे. खरे तर आधीच प्रत्येकाकडे एक नाही तर अनेक चिंता आहेत. त्यामुळे या चिंतेचे काय करायचं, असा प्रश्न उभा राहतो.  एका विचारवंताला विचारले गेले- जीवन कसे आहे?  आयुष्य म्हणजे काय?  उत्तर मिळाले - आपण ते कसे जगतो यावर सर्व अवलंबून आहे.  आपण हे जीवन कसे जगता? यावर ते म्हणतात- हे आपल्यावर अवलंबून आहे.  आपल्याला हे संभाषण काल्पनिक वाटत असल्यास, जॉन एच. मिलर काय म्हणतात बघा.  ते म्हणतात - आपण कधीही चिंता टाळू शकत नाही, परंतु जर आपण त्याबद्दल आपली मानसिकता बदलली तर चिंता दूर केली जाऊ शकते.

 अज्ञान मिटले, गोंधळ मिटला, व्यर्थाच्या चिंतेतून मुक्तता मिळाली. पण यासाठी प्रयत्न महत्त्वाचे आहेत.  याबाबत चिनी लेखक लीन युटंगे लिहितात की, जीवन केवळ जगण्यासाठी नाही तर ते हेतुपूर्ण आणि अंतर्गत विकासासाठी असते.  अंत: करणात काम करण्याची आवड आणि उत्कटता असावी लागते.  आपल्या इच्छेपेक्षा कठोर परिश्रम करण्याची क्षमता आणि उत्कटता आपले जीवन यशस्वी करता येते. जशी इच्छा,तसा मार्ग.एका महान विद्वानाने असे म्हटले होते की, जेव्हा आपण स्वार्थाच्या पलीकडे जातो आणि आपला वेळ  इतरांसाठी काहीतरी करण्यास तयार असतो तेव्हा आपण एक वास्तविक आणि सकारात्मक जीवन जगत असतो.  केवळ उर्जा आणि सकारात्मकतेने समृद्ध झाल्याने आपण आयुष्य आनंददायक बनवू शकतो.  जोहान वॉन गोएथे म्हणाले त्याप्रमाणे - जेव्हा एखादी व्यक्ती स्वत: ला पूर्णपणे शरण जाते तेव्हा देव देखील त्याच्याबरोबर चालत राहतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा