गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

वाहतूक कोंडी आणि कामाच्या वेगवेगळ्या वेळा

सुधारणांच्या सर्व उपाययोजना योजूनदेखील  महानगरे आणि मोठ्या शहरांमधल्या रस्त्यावरील रहदारीची समस्या मात्र कायम आहे. लोक ट्रॅफिक जॅममध्ये अडकत नसतील असा दिवस जात नसेल.वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी व्यवस्था नसणे ही या समस्येची प्रमुख कारणे आहेत हे सर्वांनाच माहीत आहे.वाहतूक कोंडीची ही समस्या लक्षात घेता, कर्नाटक उच्च न्यायालयाने बेंगळुरू शहरातील शाळा, कारखाने, कंपन्या, सरकारी कार्यालये आणि इतर व्यावसायिक संस्थांच्या वेळा आणि कामाच्या तासांचे पुनरावलोकन करण्याचे सुचवले आहे.

साहजिकच कार्यालये, कारखाने आणि इतर संस्थांची कामे सुरू आणि संपण्याची वेळ सारखीच असेल तेव्हा वाहतुकीचा ताण नक्कीच वाढेल. पुण्या-मुंबईला सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते सात या कालावधीत कमालीचे ट्रॅफिक असते,याचा अनुभव सगळ्यांनीच घेतला आहे. हीच अवस्था आपल्या देशातल्या महानगर आणि मोठ्या शहरांची आहे.उच्च न्यायालयाच्या या सूचनेमागचा हेतू दिसतो की कामाच्या वेळेत सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या वेगवेगळ्या वेळा ठरवण्यात याव्यात, जिथे तसे करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कार्यालये आणि आस्थापनांच्या वेळा वेगळ्या असतील तर वाहतुकीवरचा ताणही कमी होईल. तसं पाहायला गेलं  तर रेंगाळणारी वाहतूक व्यवस्था हा आज शहरी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.ही समस्या इतकी गंभीर निर्माण झाली आहे की, ती सोडवण्यासाठी प्रत्येक उपाय कुचकामी ठरत आहे.शहरातील गर्दीच्या वेळेत, विशेषतः शाळा किंवा कार्यालयीन वेळेत रस्त्यावर वाहनांची जास्त वर्दळ असते तेव्हा ही समस्या आणखी तीव्र होते. ही समस्या एवढी गंभीर निर्माण झाली आहे की, ती सोडवण्यासाठीचे प्रत्येक उपाय कुचकामी ठरत आहेत. अशा स्थितीत संपूर्ण शहराला वाहतूककोंडीची समस्या भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शहरांनी कोणतीही पावले उचलली नाहीत, असे म्हणता येणार नाही.  परंतु औषधोपचाराची मात्रा जसजशी वाढते तसतसा त्रास वाढल्याने हे उपाय अर्धवट असल्याचे दिसून येते.रस्त्यावर रेंगाळणाऱ्या वाहतुकीमुळे इंधनाचा अपव्यय तर होतोच, शिवाय वायू प्रदूषण आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जनही होते. शहरांमध्ये प्रभावी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसणे हीही मोठी समस्या आहे.  खराब रस्ते व्यवस्थापन आणि शहरांमध्ये योग्य पायाभूत सुविधांचा अभाव हे खरूजसारखी एक खाज असल्याचे सिद्ध होत आहे.रस्त्यांवर ज्या प्रकारे खासगी वाहनांचा ताण वाढत आहे, त्यामुळे परिस्थिती आणखी स्फोटक व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही तज्ज्ञ वेळोवेळी देत ​​आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक शहराच्या नियोजनकर्त्यांना अशी यंत्रणा विकसित करण्याच्या दिशेने पुढे जावे लागेल, जे या संकटातून बाहेर पडण्यासाठी काम करेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करून वाहने शेअर केल्यास ही समस्या काही प्रमाणात दूर करण्यात यश मिळू शकते.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा