राज्यात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पन्नास ते पंचवीस टक्के इतकी पगारात कपात करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सरकारी कर्मचारी लोकांनी राज्याला आर्थिक आधार देण्याची गरज आहे,हे लक्षात घेतले तरी सरकारने केलेली सक्तीची कपात जास्त प्रमाणात असून कर्मचाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारी आहे. मुळात शासकीय कर्माचारी कर्ज, इतर गुंतवणूक वजा जाता फक्त 25 टक्के पगार घेत असतो.
मंगळवार, ३१ मार्च, २०२०
रविवार, २९ मार्च, २०२०
मोटारीची काळजी घ्या, अन्यथा बसेल फटका
कोरोनाच्या संकटामुळे सध्या नागरिकांना
घरातच बसून राहावे लागत आहे. प्रशासनाने वाहतूक
बंदीची अंमलबजावणी सुरू केली असल्याने नागरिकांची वाहने एकाच ठिकाणी थांबून आहेत.
वास्तविक आठवड्यापेक्षा जास्त काळ गाडी एकाच ठिकाणी थांबून असेल तर बॅटरी
उतरण्याची शक्यता असते. परिणामी ती सुरू होऊ शकत नाही.
तसेच व्हील अलाइनमेंटवरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे बंद मोटारींची काळजी वेळेत घेतली तर आर्थिक भुर्दंड वाचू शकतो.
शिवाय त्रास हा वेगळाच. ऐनवेळी उपयोगी येणारी गाडी
जर उपयोगी पडत नसेल तर त्याचा काय त्रास होतो, याची कल्पना वाहनधारकांना
आहे.
रविवार, २२ मार्च, २०२०
पाणी वाचवा,देश वाचावा
पृथ्वीवरील मानवजातीच्या अतिरेकामुळे आज निसर्गाचे संपूर्ण संतुलन बिघडत चालले आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांची मुख्य गरज पाणी आहे. कारण पाण्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. भारतासह अनेक देशांमध्ये उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण होते. आजही अनेक देश पिण्याच्या पाण्यासाठी झुंज देत आहे. कारण ही बाब सर्वांना माहित आहे की पाणीच जीवन आहे, त्यामुळे प्रत्येक देशाचे कर्तव्य बनते की पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)