मंगळवार, ३१ मार्च, २०२०

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात

राज्यात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पन्नास ते पंचवीस टक्के इतकी पगारात कपात करण्यात आली आहे.  कोरोना व्हायरसचा वाढता  धोका लक्षात घेता सरकारी कर्मचारी लोकांनी राज्याला आर्थिक आधार देण्याची गरज आहे,हे लक्षात घेतले तरी सरकारने केलेली सक्तीची कपात जास्त प्रमाणात असून कर्मचाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारी आहे. मुळात शासकीय कर्माचारी कर्ज, इतर गुंतवणूक वजा जाता फक्त 25 टक्के पगार घेत असतो.

रविवार, २९ मार्च, २०२०

मोटारीची काळजी घ्या, अन्यथा बसेल फटका


कोरोनाच्या संकटामुळे सध्या नागरिकांना घरातच बसून राहावे लागत आहे. प्रशासनाने वाहतूक बंदीची अंमलबजावणी सुरू केली असल्याने नागरिकांची वाहने एकाच ठिकाणी थांबून आहेत. वास्तविक आठवड्यापेक्षा जास्त काळ गाडी एकाच ठिकाणी थांबून असेल तर बॅटरी उतरण्याची शक्यता असते. परिणामी ती सुरू होऊ शकत नाही. तसेच व्हील अलाइनमेंटवरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे बंद मोटारींची काळजी वेळेत घेतली तर आर्थिक भुर्दंड वाचू शकतो. शिवाय त्रास हा वेगळाच. ऐनवेळी उपयोगी येणारी गाडी जर उपयोगी पडत नसेल तर त्याचा काय त्रास होतो, याची कल्पना वाहनधारकांना आहे.

रविवार, २२ मार्च, २०२०

पाणी वाचवा,देश वाचावा

पृथ्वीवरील मानवजातीच्या अतिरेकामुळे आज निसर्गाचे संपूर्ण संतुलन बिघडत चालले  आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांची मुख्य गरज पाणी आहे. कारण पाण्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. भारतासह अनेक देशांमध्ये उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची टंचाई निर्माण होते. आजही अनेक देश पिण्याच्या पाण्यासाठी झुंज देत आहे. कारण ही बाब सर्वांना माहित आहे की पाणीच जीवन आहे, त्यामुळे प्रत्येक देशाचे कर्तव्य बनते की पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे.

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

सोशल मीडिया आणि किशोरवयीन मुलं

नुकतेच एक सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या किशोरवयीन मुलींना लवकर नैराश्य येत असल्याचे म्हटले आहे.हे प्रमाण मुलांच्या दुप्पट आहे. सोशल मीडिया आणि नैराश्याची लक्षणे यांच्यावर करण्यात आलेले हे पहिलेच संशोधन असून ई क्लिनिकल मेडिसिन या नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे. लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधकांनी सुमारे ११ हजार तरुणांची माहिती यासाठी अभ्यासली. त्यामध्ये १४ वर्षांच्या मुली सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी दोन पंचमांश मुली रोज तीन तास सोशल मीडियावर घालवत असल्याचे समोर आले आहे, तर या वयाची एक पंचमांश मुले इतकाच वेळ सोशल मीडियावर घालवत असल्याचे समोर आले आहे.

बुधवार, २२ जानेवारी, २०२०

डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या

अलीकडे वेगवेगळ्या व्हटॅमिन्स, कॅल्शियमच्या गोळ्या बिनदिक्कतपणे घेणं सामान्य गोष्ट बनली आहे. किंबहुना, धावपळीमुळे थकवा जाणवतो, चाळीशीनंतर कॅल्शियमची कमतरता भासते. अशा ऐकीव माहितीवरुन काही लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:च मेडिकलमधून गोळ्या आणतात आणि घ्यायला सुरुवात करतात; परंतु संपूर्ण माहितीशिवाय आणि किती आवश्यकता आहे हे न जाणता अशा गोळ्या घेणं लाभदायक ठरत नाही. किंबहुना, त्यांचे दुष्परिणामच दिसण्याची शक्यता असते.

मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

खेळण्यासाठी मैदाने विकसित करा

मुले खेळायचे विसरून गेली आहेत. शहरातील मुले शाळा, विविध प्रकारचे क्लासेस यातच गुरफटून गेली आहेत आणि राहिलेला वेळ मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही यातच घालवत असल्याने ही मुले खेळापासून दूर गेली आहेत. ग्रामीण भागातही कमी जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यांना खेळायला बाहेर काढणे आवश्यक आहे,यासाठी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासन यांनी संयुक्त रित्या मुलांना खेळासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

सोमवार, २० जानेवारी, २०२०

महिलांच्या हाताला काम द्या

आपल्या देशात अजूनही शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योग क्षेत्रात महिला मागेच आहेत. वास्तविक महिला सर्व स्तरावर भक्कम असल्या तर संबंधित कुटुंब प्रगतीपथावर राहण्यास मदत होते. आपल्याकडे अजून ही 18 ते 30 वयोगटातील महिला मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्यातच महिलांना अडकवून सोडले आहे. नुकतेच दृष्टी स्त्री अध्ययन आणि प्रबोधन केंद्र या संस्थेमार्फत देशातील महिलांचे विविध पातळ्यांवर सर्व्हेक्षण करण्यात आले. यात निम्म्या महिला नोकरी, व्यवसाय न करणाऱ्या आहेत. प्रजनन क्षम वय, कौटुंबिक जबाबदाऱ्या अशी विविध कारणे आहेत. रोजंदारीवर जाणाऱ्या महिलांना पुरुषांपेक्षा कमी मजुरी मिळते.मात्र महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असतात.तरीही हा भेदभाव का, असा प्रश्न आहे.