गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

भारतात ब्रेस्ट कॅन्सरने मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक

जगभरात 'ब्रेस्ट कॅन्सर'च्या रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी भारतात ब्रेस्ट कॅन्सर आजार हा प्रथम क्रमांकावर आहे. विदेशात 'ब्रेस्ट कॅन्सर'चे प्रमाण अधिक आहे. परंतु, 'ब्रेस्ट कॅन्सर'मुळे मृत्यूचे प्रमाण भारतात अधिक आहे. त्यामुळे भारतीय महिला व तरुणींनी 'ब्रेस्ट कॅन्सर'बाबत जागरूक राहण्याची गरज आहे.
'ब्रेस्ट कॅन्सर'चे प्रमाण भारतासह जगभरातच वाढत असून उशिरा लग्न व ब्रेस्ट फ्रिडिंग ही कारणे सांगितली जात आहे. भारतात कमी वयात म्हणजेच ४0 ते ५0 वर्षे वयोगटात 'ब्रेस्ट कॅन्सर'चे रुग्ण आढळून येत आहेत, तर इतर देशांमध्ये ५0 ते ६0 वयोगटांमध्ये 'ब्रेस्ट कॅन्सर' वाढत आहे. भारतात तरुणाईची संख्या जास्त आहे. त्यामुळे तरुणाईमध्येही 'ब्रेस्ट कॅन्सर'चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारण म्हणजे, भारतीय तरुणी किंवा महिला आरोग्याबाबत फारशा जागरूक नाहीत. खूप त्रास होईल तेव्हाच त्या डॉक्टरांकडे जातात. ही भारतीयांची जणू मानसिकताच बनली आहे. म्हणजेच 'ब्रेस्ट कॅन्सर'ची लागण झाल्यानंतर तिसर्‍या किंवा चौथ्या स्टेजला त्या उपचारासाठी डॉक्टरांकडे जातात. तोपर्यंत उपचाराची वेळ निघून गेली असते आणि नंतर मृत्यूचीही शक्यता बळावते. भारतात आजाराचे ६0 टक्के निदान हे तिसर्‍या किंवा चौथ्या स्टेजमध्ये केले जाते. तरुणाईमध्ये 'ब्रेस्ट कॅन्सर' तीव्र स्वरूपाचा असतो. त्यामुळे तरुणी किंवा तरुण महिलांनी गाठ आढळताच ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करवून घेणे महत्त्वाचे आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे,जत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा