मंगळवार, १९ मे, २०२०

मोबाईलवर 'शिक्षण' विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसाठी घातक!

शिक्षण विभागातीकडून सध्या 'लर्न फ्रॉम होम' उपक्रम राबवण्यात येत आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात विद्यार्थ्यांना 'स्मार्ट शिक्षण' हे 'स्मार्ट फोन' च्या माध्यमातून देण्याच्या हालचाली सुरू आहेत, मात्र  या गोष्टी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकरिता घातक ठरू शकतात. काही अतिउत्साही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या डोक्यातून विद्यार्थ्यांकरिता 'लर्न फ्रॉम होम'ची कल्पना पुढे आली आणि तिच्या अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकार्‍यांकडून अट्टाहास सुरू झाला आणि कालपर्यंत विद्यार्थ्यांना मोबाईल बघायला मनाई करणारे गुरुजीच 'मोबाईल पहा रे' मुलांनो असे आवर्जून विनवणी करू लागले.

शुक्रवार, १५ मे, २०२०

बांधकाम व्यवसायाला चालना मिळायला हवी

लॉकडाऊन वाढल्यामुळे उत्पादन, बेरोजगारी, मजुरांचे स्थलांतरण या सर्व गोष्टीत वाढ झाली. लॉकडाऊनमुळे सर्वात मोठा फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. लॉकडाऊननंतर ज्या बांधकाम मजुरांचे पोट हातावर होते त्यांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. शिवाय बांधकाम क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. या क्षेत्रातील मजूर  आपापल्या गावी ,राज्यात गेल्याने आता काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण होणार आहे. आपल्या गावी परतलेले मजूर पुन्हा परत येतील याचीही काही निश्‍चिती राहिली नाही.  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक लोक बांधकामाला सुरुवात करतात किंवा घर खरेदी करतात परंतु यावेळी लॉकडाऊन असल्यामुळे हा मुहूर्तही बांधकाम व्यावसायिकांना हुलकावणी देणाराच ठरला आहे.

गुरुवार, १४ मे, २०२०

सकारात्मक विचारांची गरज

ऑरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याचा आनंद व दुःख हे समाजाला धरून असते. लॉकडाउनच्या काळात माणसं समाजापासून अलिप्त राहिली. अशा परिस्थितीत काहींच्या मनात नकारात्मक मानसिकता तयार होत असते. लॉकडाउनचा कालावधी जास्तच वाढल्याने अनेकांना भविष्याची चिंता लागून राहिली. अनेकांचे आर्थिक आणि सामाजिक स्थैर्यही धोक्यात आले आहे. याचे दूरगामी परिणाम सर्व क्षेत्रांवर होणार आहेतच. अनेकांचे रोजगार बुडाले आहेत.

रविवार, १० मे, २०२०

हा तर कसोटीचा काळ

लॉकडाउन शिथिल केल्यानंतरचे चित्र अस्वस्थ करणारे आणि धोक्याची सूचना देणारे आहे.  आजपर्यंत विनाकारण फिरणाऱ्या हजारो तरुणांवर वाहने जप्त करून कारवाई केली. ती अद्याप सुरूच आहे. काहीजण मास्क न वापरता बाहेर पडताहेत. काम नसतानाही बाहेर पडणारे अनेकजण आहेत. बाहेर आल्यानंतर सामाजिक दुरावा प्रत्येकाने पाळायलाच हवा; पण काहीजण त्याचेही पालन करताना दिसत नाहीत. पुण्या-मुंबईतून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लोकांची बेकायदा घुसखोरी सुरू आहे. सारेच घरात असल्यामुळे लॉकडाउनच्या पहिल्या आणि दुसऱ्या
आवर्तनात संसर्गाचा जास्त धोका उद्भवला नाही; पण लॉकडाउन ३.०  मध्ये तो धोका अधिक आहे आणि याच टप्प्यावर जबाबदारीची जाणीव  कमी झाल्याचे चित्र आहे.

शुक्रवार, ८ मे, २०२०

कोरोना आणि कॅशलेस इंडिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्यापासून सुरू असलेल्या 'लॉकडाऊन' चा सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. 'बँकिंग' व्यवसायाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. संसर्ग टाळण्यासाठी बँका ऑनलाईन बँकिंगचा वापर करण्यासाठी आवाहन करत आहेत. तरूण पिढी मोबाईल बँकिंगचा सध्या वापर करतच आहे. नोटांबंदीनंतर ऑनलाईन बँकिंगला सुरुवात झाली असली तरी त्याला आता आणखी वेग येण्याची गरज आहे. लॉक डाऊन आणि संचारबंदीच्या काळात मोबाईल बँकिंगचा सर्वाधिक वापर झाला असला तरी त्याला अजून मर्यादाच आहेत. मोबाईल बील, वीज बिल, डिश रिचार्ज, कर्जाचे हफ्ते, विमा, वाहन विमा अशा गोष्टी मोबाईल मधून करता येत आहेत.

सोमवार, ४ मे, २०२०

मोठ्या शहरांमध्ये सायकल संस्कृती रुजवावी

मुंबई, पुण्याबरोबरच राज्यातल्या मोठ्या शहरातील सर्व प्रकारच्या वाहतूकव्यवस्थेला शिस्त लावायची असल्यास लॉकडाऊनचा फायदा उचलत पालिकांनी आपल्या अधिकारात पदपथ सामान्य नागरिकांसाठी मोकळे करावेत तसेच सायकल संस्कृती रुजवण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात. यामुळे पादचारी लोकांना मोकळा श्वास मिळेल आणि वातावरण प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल.