अलीकडच्या काही वर्षांत वाढदिवस साजरा करण्याचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र त्याला बीभत्सपणाही येत आहे. तरुण पिढी रस्त्यावर सुद्धा वाढदिवस साजरा करून सार्वजनिक शांतता भंग करत आहे. वास्तविक वाढदिवस साजरा कारणं काही वाईट गोष्ट नाही,पण तो साजरा करताना समाजाला काही उपयोग होईल का,हे पाहायला हवे. आपल्या आयुष्याचे एक वर्ष कमी झाले आहे. हे लक्षात ठेवून आपण समाजासाठी काही तरी करायला हवे,याचे भान यायला हवे. त्यामुळे आपला वाढदिवस एक उपक्रम घेऊन आला पाहिजे. वाढदिवस लक्षात ठेवायचा असेल तर या दिवशी प्रत्येकाने वृक्षारोपण करण्याचा चांगला पायंडा पाडायला हवा. निसर्गाचे तापमान वाढत आहे.'विनाश थांबवा, भूमातेचे तन मन जळते आहे.' या उक्तीनुसार वाढलेल्या तापमानाचा सामना करताना
सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे.



