विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर
झाले आहे. त्यामुळे
मानव उपयोगी नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी वैज्ञानिक झटत आहेत. मात्र दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे होणार्या दुष्परिणामावर नियंत्रण
मिळविण्यासाठी समानांतर संशोधन करावे लागत आहे. कुठल्याही गोष्टीचा
अतिरेक हा घातकच ठरतो, तसेच तंत्रज्ञान वापराचेही होत आहे.
त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना संवेदनशीलता बाळगण्याची वेळ आता
आली आहे. गेल्या काही दशकापासून तंत्रज्ञानाचा कल्याणकारी उपयोग
मागे पडत असून, दुष्परिणाम वाढले आहेत. काही विघातक मनोवृत्तीतून मानवसृष्टीला नष्ट करणारी अणुहत्यारे निर्माण केली
जात आहेत.
बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९
सुक्ष्म सिंचन पद्धतीबाबत जागृती हवी
गेल्या
पंधरवड्यातील राज्यातल्या घटना पाहा. 16 जिल्ह्यातल्या शहरांना
आणि नदी परिसरातील गावांना महापुराचा फटका बसला. सुुमारे बारा
हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. ( बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस
नाही.) आपल्याकडे पाऊस नियमित नाही. 2005 मध्ये असाच मोठा पुराचा फटका बसला होता. त्यानंतर सर्वात
मोठा फटका बसला आहे. असे असले तरी आपल्याकडे नद्या या पावसाळ्यातच
दुथडी भरून वाहतात.मात्र उन्हाळ्यात त्यातील बहुतांश नद्या कोरड्या
पडतात. त्यामुळे पाण्याचे नियोजन ही आवश्यक गोष्ट झाली आहे.
अनेक ठिकाणी नियोजनाअभावीच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.
शाळांच्या वीजबिलाचा प्रश्न सोडवा
वीज वितरण
कंपनीने जिल्हा परिषदांच्या शाळांना व्यावसायिक बिलाची आकारणी करून आता सात आठ वर्षे
झाली आहेत. या पद्धतीच्या आकारणीमुळे या शाळांना सातशे ते आठशे
वीज बील दर महिन्याला येत आहे. या बिलाची तरतूद कोणत्या योजनेतून
करावी असा प्रश्न आहे. शिवाय यासाठी खास
निधी येत नाही. साहजिकच याचा आर्थिक भार मुख्याध्यापकांवर पडत
आहे. एकिकडे जिल्हा परिषदांच्या बहुतांश शाळांमध्ये संगणक,
ई-लर्निंगचा वापर होत आहेत. लोकवर्गणी, जिल्हा परिषद निधी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या
माध्यमातून ई-लर्निंग सुविधा उपलब्ध होत आहेत.यासाठी विजेची नितांत आवश्यकता आहे.
सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया व्हावी
पाणी हा
परमेश्वराचा प्रसाद आहे, त्याचा अमर्याद
वापर झाला तर त्याचा एक दिवस हिशोब चुकता करावा लागेल. यामुळे
शेतकर्यांनी आणि लोकांनी घरगुती वापराच्या पाण्याचा वापर काटकसरीने
करायला हवा, असे प्रतिपादन अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या
भाषणात वारंवार सांगत असतात. मोदी यांनी मागे गंगा नदीच्या शुद्धीकरणाचा
निर्णय घेतल्यावर देशातील अन्य नद्यांच्या शुद्धीकरण करावे, अशी
मागणी जोर धरली आहे. पृथ्वीतलावर 71 टक्के
पाणी असले तरी सगळ्याच पाण्याचा वापर करता येत नाही.त्यामुळे
सध्या सगळीकडे सांडपाण्याचा पसारा वाढला आहे. हेच पाणि वाहत्या
नदींमध्ये मिसळत आहे. लोक आजाराला बळी पडत आहेत. परदेशात सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून त्याचा अन्य कामांसाठी वापर
केला जात आहे.
एटीएम कार्ड वापरण्याचे प्रशिक्षण द्या
एटीएम कार्डची मुदत संपली
आहे. क्रेडिट कार्डची
पत वाढविण्यात येत असल्याचे फोनवरून सांगून भामटे स्वत: बँकेचा
अधिकारी असल्याचे बतावणी करतात. बर्याचदा
ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा एटीएम कार्डवरील नंबर वाचून
सांगा अथवा कार्ड बंद होईल, असे सांगतात. त्यांच्यावर विश्वास ठेवून नागरिक एटीएम कार्ड,
डेबिट कार्डवरील नंबर सांगून मोकळे होतात. सायबर
गुन्हेगार त्या क्रमांकाच्या आधारे दुसरे एटीएम कार्ड तयार करतात अथवा त्या नंबरच्या
आधारे ऑनलाईन खरेदी करून लाखो रुपयांना चुना लावतात. इंटरनेट, संगणक
आणि मोबाईलच्या वापरासोबत या साधनांचा वापर करून गुन्हे करणार्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. विशेषत:
एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा
क्रमांक आणि पासवर्ड मिळवून ऑनलाईन गंडविण्याच्या घटना वाढल्या आहेत. हे लोण आता ग्रामीण भागातही पोहचले आहे.
मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९
अमिताभ आणि यकृताबाबत गैरसमज
प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतेच आपले यकृत 75 टक्के निकामी झाले असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे, आणि हे सांगताना त्यांनी आपण अगदी ठणठणीत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय मला टीबी आणि हेपेटायटीस-बी झाल्याचे सांगताना वाईट किंवा अपमानास्पद वाटत नाही, असेही स्पष्ट केले आहे. टीबीबद्दल जागरूकता संदेश देताना ते स्वतःचे आपले उदाहरण देत असतात.
शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८
क्रांतिगुरू साळवे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी फक्त
एका कुठल्या समाजासाठी काम केले नाही. मात्र शासन त्यांना
एका समाजापुरते आणि एका जिल्ह्यापुरते मर्यादित ठेवत आहे. हे
योग्य नव्हे. शासनाने साळवे यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे
बनवायला हवे. आणि त्यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार देशभराबरोबरच
आंतरराष्ट्रीय स्तरावरही व्हायला हवे, अशा दृष्टीने प्रयत्न होण्याची
गरज आहे. पुणे येथील संगमवाडी येथे साळवे यांची समाधी आहे.
याच जागेवर राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून मातंग समाजसह अनेक संघटनांनी
व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 68 वर्षांपासून मागणी
केली आहे. शिवाय मागील सरकारमध्ये असलेले चंद्रकांत होंडरे,
माजी खासदार सुरेश कलमाडी, भाजपाचे नेते गोपीनाथ
मुंडे यांनी याच जागेवर राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी पाठपुरावा केला होता. याच धर्तीवर भाजपचे स्थानिक नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
2017 रोजी संगमवाडी येथे समाधी स्थळाजवळील झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय
स्मारक होणार व पुरेसा निधी उपब्लध करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र शासनाच्या प्रशासनाने फक्त जिल्हा स्तरीय समिती स्थापन करून समाजाच्या
भावना दुखावल्या आहेत. वास्तविक साळवे यांनी फक्त एका जातीसाठी
काम केले नाही, तर देशहित व स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरोधात
लढून अनेक क्रांतिकारकांना प्रशिक्षण देऊन लढवय्ये बनविले, अशा
आद्य क्रांतिगुरूचे स्मारक फक्त जिल्हा स्तरीय पुरते मर्यादित न ठेवता त्याला आंतरराष्ट्रीय
दर्जा देण्यात यावा. शासनाने त्वरित आद्यक्रांतिगुरू स्वतंत्र
भारताचे विधाता, सशस्त्र क्रांतीचे जनक साळवे यांचे आंतरराष्ट्रीय
स्मारक होण्यासाठी विधिमंडळामध्ये याच अधिवेशनात ठराव मंजूर करून घावा. स्मारकासाठी पाच एकरापेक्षा जागा संपादित करावी.
- मच्छिंद्र
ऐनापुरे,जत
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)