विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर
झाले आहे. त्यामुळे
मानव उपयोगी नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी वैज्ञानिक झटत आहेत. मात्र दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे होणार्या दुष्परिणामावर नियंत्रण
मिळविण्यासाठी समानांतर संशोधन करावे लागत आहे. कुठल्याही गोष्टीचा
अतिरेक हा घातकच ठरतो, तसेच तंत्रज्ञान वापराचेही होत आहे.
त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना संवेदनशीलता बाळगण्याची वेळ आता
आली आहे. गेल्या काही दशकापासून तंत्रज्ञानाचा कल्याणकारी उपयोग
मागे पडत असून, दुष्परिणाम वाढले आहेत. काही विघातक मनोवृत्तीतून मानवसृष्टीला नष्ट करणारी अणुहत्यारे निर्माण केली
जात आहेत.
निसर्गाच्या नियमाला डावलून तंत्रज्ञानाचा उपयोग झाला,
तर तो धोकादायक ठरेल.-मच्छिंद्र ऐनापुरे,
जत(सांगली)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा