राज्यात एकिकडे जनता महापुराने त्रासली असताना आणि दुसरीकडे पावसाविना दुष्काळी तहानली असताना राज्य शासन आणि प्रशासन कृत्रीम पावसाची बनवेगिरी करत असल्याचा प्रकार संतापजनक आहे.या शिवाय कृत्रीम पावसासाठीचा 31कोटीचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. मात्र ही बनवेगिरी राज्यातल्या जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असून याचा जाब जनतेने विचारायला हवा. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई व्हायला हवी. कृत्रीम पावसासाठीचे विमान अद्याप भारतातच दाखल झाले नसल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे राज्य शासनाकडून कृत्रीम पावसाची तारीख पाळण्यासाठी ही दिखावेगिरी केली जात असल्याची चर्चा आहे. मागे 8 ऑगस्टला औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाच्या अधिकार्यांनी कृत्रीम पावसाची तयारी पूर्ण झाली असल्याचे आणि पावसासाठीचे विमान आले असल्याचे सांगितले होते. प्रयोगाला सुरुवात करत असल्याचेही स्पष्ट केले होते. पण प्रत्यक्षात पावसासाठी लागणारे विमान अद्याप सौदी अरेबियातच असल्याचे पुढे आले असल्याने चक्क राज्य शासनच जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करत आहे, त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न आहे.
कृत्रीम पावसासाठी डॉपलर रडार बसवण्यात आले आहे. मात्र यासाठी महत्त्वाचे लागणारे सी-90 हे विमान औरंगाबादमध्येच नव्हे तर भारतातच आले नाही. अमेरिकेहून निघाल्यावर हे विमान आता सौदी अरेबियात अडकले आहे. इथे विमानातील तांत्रीक त्रुटी दूर केल्या जात आहेत. अजून या विमानाला भारतात यायला आठवड्याभराचा अवकाश असल्याचे सांगितले जात असले तरी त्याची अद्याप खात्री नाही. प्रशासनाने मात्र सोलापूरला असलेले आयआयटीएमचे विमान मागवल्याचा बनाव केला. विशेष म्हणजे हे विमान औरंगाबादमध्ये दोन दिवस थांबले होते. आणि नंतर ते सोलापूरला परतही गेले. हा चक्क फसवणुकीचा प्रकार असून शासन यातून काय साध्य करणार आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शासन आपण दुष्काळी जनतेसाठी काम करत असल्याचा कांगावा करत आहे. सध्या शासनाला कोणत्याही प्रकारे निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेवर यायचे आहे. त्यामुळे शासनाकडून असला जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार होत आहे. शासन नोकर भरती उंबरठ्यावर आणली आहे,कर्मचार्यांना सातवा वेतन दिला आहे.मराठ्यांना आरक्षण जाहीर केले. धनगर सुपात आहे. जनताप्रिय निर्णय घेण्याचा सपाटा सध्या सुरू आहे, मात्र प्रत्यक्षात जनतेच्या हातात काय मिळणार, हे पाहावे लागणार आहे.
सध्या राज्यात मुंबई , ठाणे, कोल्हापूर, सांगली, नाशिकसारखी शहरे महापुराने पुरती घायाळ झाली आहेत तर बहुतांश जिल्हे पाऊस नसल्याने तहानली आहेत.फक्त नदीकाठच्या आणि धरण क्षेत्रातल्या शहरांना पुराचा फटका बसला आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच आहे. कृत्रीम पावसाचा निर्णय मुळात घाईघाईत घेतला आणि त्यासाठी फक्त 31 कोटींची तोकडी तरतूद केली.आणि कृत्रीम पावसाचे विमान आले आणि प्रयोगही सुरू झाला, असे सांगून आम्ही दुष्काळी जनतेचे कैवारी आहोत, असे सांगून सहानुभूतीही मिळवण्याचा प्रयत्न केला. पण कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही, याची प्रचिती आली. आणि बनवेगिरी उघड झाली.-मच्छिंद्र ऐनापुरे, नाशिक 7038121012
कृत्रिम पावसाचा प्रयोग नाहीच
उत्तर द्याहटवापावसाळा सुरू झाल्यानंतर ढग येतात, पण पाऊस पडत नाही, अशावेळी काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडला जातो. हवेतील बाष्प एकत्र येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एखाद्या लहानशा कणाची आवश्यकता असते. महाराष्ट्रात २००३, २००४ आणि २००९, २०१० व २०१९ मध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले होते. यंदा पावसाने दडी मारल्याने कृत्रिम पावसाची शक्यता वर्तविली गेली,पण तसा कोणताही विचार नसल्याचे मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.