आमदारकी आणि खासदारकीसाठी महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा मागेच पडत चालला आहे.
देशात पन्नास टक्के महिला असल्यातरी त्यांना इथे अद्याप म्हणावे असे
प्रतिनिधीत्व मिळत नाही. आपल्या पुरोगामी राज्याचा विचार केला
तर इथेही आपल्याला निराशाच पाहायला मिळते. 2014 च्या निवडणुकीत
अवघ्या 21 महिलांना आमदार पदाची संधी मिळाली आहे. या निवडणुकीत 277 महिलांनी निवडणूक लढवली होती.
दुर्दैवाने यातल्या 237 महिला उमेदवारांचे डिपॉझीट
जप्त झाले होते. 2014 मध्ये महिला आमदारांची एकूण टक्केवारी फक्त
आठ ट्क्के होती. 2009 मध्ये तर फक्त 12 महिला आमदार पदावर विराजमान झाल्या होत्या. ज्या काही
महिला आमदार म्हणून निवडून आल्या ,त्यातल्या बहुतांश महिला या
वारशाने आमदार झाल्या आहेत. त्यांच्या मागे भक्कम राजकीय ताकद
उभी होती. मात्र सर्वसामान्य महिलांना ही संधी दूरच आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षणामुळे
महिलाराज आले असले तरी जिथे कायदे होतात, त्या लोकसभा आणि विधानसभेत
मात्र महिलांसाठी कसलेच आरक्षण नाही.
शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९
शरीराकडे लक्ष द्या
आपल्या आयुष्यात तन आणि मन यांची एक
निश्चित भूमिका आहे. नेहमी आपल्याला
आपल्यात बदल हवा असतो. आपण बदलायला हवं, असं म्हणतो. तेव्हा आपण मनाचा विचार करतो. त्याची ताकद समजून घेतो. पण याच वेळेला आपण शरीराकडे
दुर्लक्ष करतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपल्याला बदल हवा असतो, तेव्हा फक्त मनाची आवश्यकता असत
नाही. यात आपल्या शरीराचाही मोठा हातभार असतो. एकदा विश्वनाथ आनंदला धावताना लोकांनी पाहिलं.
लोकांनी विचार केला, अरे, बुद्धिबख खेळाडूला धावण्याची काय गरज आहे? हा तर बसून
डोक्याने चालतो. झालं! लोकांनी त्याला गाठलंच!
त्याने सांगायला सुरुवात केली, जर आपले शरीर ठीक
नसेल, तर आपण ठीक विचारही करू शकणार नाही. आपण आपला डाव कसा खेळू शकणार? आपण आजारी असलो तर आपले
विचार वेगळे असतात. आपल्या आजाराचा आपल्या मनावर प्रभाव पडतो.
मनाला थकवा आलेला असतो. एक प्रकारची मरगळ आलेली
असते. आणि आपण तंदरुस्त असतो तेव्हा विचार बिलकूल वेगळे असतात.
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९
भाजप शिस्तीचा पक्ष राहिला नाही
भाजपमध्ये सध्या पक्षांतराचा महापूर आला आहे. मात्र यापूर्वी कार्यकर्त्यांची निवड ही काटेकोरपणे आणि सर्व बाबी तपासून केली जायची. परंतु, आता तसे होत नाही. भाजपमध्ये कोणाला घेताना त्याच्या सर्व बाबी तपासल्या जायच्या. पण आता फक्त खोगीर भरती सुरू आहे. याला पुष्ठी देणारी नुकतीच एक बातमी आली आहे. भाजप सदस्यांची संख्या १८ कोटींवर पोचली आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप सध्या मिरवत आहे. एक जमाना असा होता, की चीन आणि रशियातील साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्ष हे जगातील सर्वात मोठे पक्ष गणले जात. अर्थात त्याचे कारण वेगळेच होते कारण त्या देशांत दुसर्या पक्षांना टिकूच दिले जात नव्हते. या पक्षांचे कोट्यवधी सदस्य होते. रशियात साम्यवादी कार्यकर्त्यांची संख्या दोन कोटी होती तर चीनमध्ये ही संख्या नऊ कोटी एवढी होती.
बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९
नव्या वाहन कायद्यामुळे भ्रष्टाचाराला चालना
केंद्र सरकारने अलीकडेच नवीन मोटार वाहन कायदा पारित केला आहे . या कायद्यान्वये दंडाची रक्कम दहा पटीपेक्षा जास्त वाढविण्यात आलेली आहे. ही वाढ रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने योग्य असली तरी त्याची अंमलबजावणी बजावणी यंत्रणा कशा प्रकारे करते, यावर त्याचे यश अवलंबून आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहिल्यास या यंत्रणेला चराऊ कुरण मिळणार आहे, असेच सध्या तरी दिसते. कायदे कडक असणे हे जरी आवश्यक असले तरी कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा भारतात भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे .
गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९
सरकारने जगलेल्या झाडांचा हिशेब द्यायला हवा
राष्ट्रीय वन धोरणानुसार राज्याचे 33 टक्के भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि, महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ 20 टक्के असल्याने लक्षणीय वाढ करण्यासाठी येणाऱ्या 3 वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे.
मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९
उत्सवाचे बदलते स्वरूप
अलिकडे गणेशोत्सवाचे स्वरूप वरचेवर व्यावसायिक होत चालले आहे. बहुसंख्य गणेशोत्सव मंडळांचे पैसे उभारण्याचे मार्ग बदलले आहेत. त्यांनी चक्क आमदार, खासदार आणि नगरसेवकांना गाठायला सुरुवात केली आहे. या लोकांना गाठून लाखाचा आकडा टाकला की, दारोदार फिरून पैसे गोळा करण्याची काही गरजच रहात नाही. दारोदार फिरून वर्गणीची हा आकडा मिळत नाही. नेते मंडळीही नाहीतरी निवडणुकीत पैसे वाटतच असतात. तेव्हा त्यतोच पैसा गणेश मंडळे अशा स्वरूपात मिळवत आहेत.
रविवार, १ सप्टेंबर, २०१९
उत्सवाचा उद्देश सफल व्हावा
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव जनजागृती करण्यासाठी सुरू केला. त्यामागे समाज प्रबोधन करण्याचा मुख्य हेतू होता. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश स्वातंत्रपूर्व काळात जनजागृती, लोकसंघटन, लोकसंग्रह करण्यासाठी होता. स्वातंत्र चळवळीला बळ देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झाला. धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर लोकमान्य टिळकांनी जनतेला संघटित करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. परंतु, स्वातंत्र्यानंतर गणेशत्सवाचे रूपच पालटलेले दिसून येते. लोकप्रबोधनाचा मूळ उद्देश मागे पडला. वर्गणी जमवून फक्त देखावे करणे, दुसर्या मंडळाशी स्पर्धा करणे, मोठय़ा आवाजात डीजे लावून शांतता भंग करणे. गणेश विसर्जनाच्या वेळी महिलांची छेडछाड काढणे, असे प्रकार होत असताना दिसतात. रस्ते अरूंद असतानाही अनेक गणेश मंडळे विविध प्रकारचे देखावे करून नागरिकांना चालताही येऊ नये इतकी अडचण निर्माण करून फक्त स्वत:च्या हौसेपोटी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हे सुरू झाल्याचे दिसून येते. हे सर्व करत असताना लोकमान्य टिळक यांची आठवण, त्यांची मूल्ये, तत्वे याची जराही आठवण येत नाही.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




