बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९

अवयवदान ही चळवळ व्हायला हवी

जगभरात विविध क्षेत्रासह वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठी प्रगती झाली आहेविदेशातील बहुतांश लोक अवयवदान करतातत्याचा त्यांच्या देशातील गरजू रुग्णांना फायदा होतोत्या तुलनेत भारतात अवयवदान प्रक्रिया खूप मागे आहेयाबाबत जनजागृती अतिशय कमी आहेआपल्या देशात अपघातजीवनशैली बदल यामुळे उद्भवणारे आजार याचा परिणाम म्हणजे काहींचे अवयव निकामी होत आहेत आहेतपरिणामी अवयवदानाला मागणी वाढली आहे,परंतु त्याची पूर्तता होताना दिसत नाहीत्यामुळे अवयवदान हा उपक्रम न होता याची चळवळ व्हायला हवी आहेसमाजाच्या तळागाळापर्यंत अवयवदानाविषयी जनजागृती होण्याच्यादृष्टीने सर्वच माध्यमाकडूनसमाजसेवी संस्थांकडून प्रयत्न व्हायला हवेततरच यातून काहीतरी चांगले साकार होणार आहे.  एखाद्या रुग्णाचा मेंदू मृत झालातर त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय त्याच्या नातेवाईकांनी घ्यायला हवालोकांनी जीवंतपणीच याची पूर्तता करून आपल्या नातेवाईकांना याची कल्पना द्यायला हवीयासाठी प्रत्येकाने अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे
आपल्या मृत्यूनंतर कित्येक अवयव आपण दान करू शकतोमृत्यूनंतर ठराविक कालावधीपर्यंत आपले काही अवयव जिवंत असतातहे अवयव जर गरजू लोकांना मिळाले तर त्या माध्यमातून आपल्याला जिवंत राहता येईलसध्या त्वचादान करण्याची मागणी वाढत आहेपण एकंदरीत विचार केला तर याबाबत जनजागृती व्हायला हवीसध्या अवयव बदलण्याची प्रक्रिया केवळ खाजगी रुग्णालयात सुरू आहेही व्यवस्था जर सरकारी रुग्णालयांमध्ये सुरू झाली तर अवयव बदलण्याचा खर्च शेकडो पटींनी कमी होईल.लोकही पुढे येतीलशासनाने याबाबत लवकरात लवकर पावले उचलायला हवीतअवयव दान करण्याचा संकल्प सोडणार्या व्यक्तीस काही सवलती द्याव्यातत्याच्या पश्चात त्याच्या कुऋटुंबालाही काही गोष्टींमध्ये सवलती द्याव्यातजेणे करून अवयवदानासाठी लोक पुढे येतील.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

1 टिप्पणी:

  1. आजही मृत व्यक्‍तीच्या बाबतीत कुटुंबाची भावनिक गुंतागुंत असल्याने भविष्यातील डॉक्टरांना शरीरशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मृतदेह उपलब्ध होत नाहीत. एवढेच नाही तर आज अवयवाची आवश्यकता असलेल्यांची प्रतीक्षायादी वाढत चालली आहे. हे चित्र बदलायचे असेल तर अवयवदानाबाबत भारतीय मानसिकता बदलायला हवी. अवयवदानाची संस्कृती रुजायला हवी. केवळ पैसे आणि अवयव नाहीत म्हणून अनेक मृत्यू पाहावे लागतात, अवयवदानाच्या क्षेत्रात जेवढे काम होणे अपेक्षित
    त्याच बरोबरीने निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने देखील समांतर प्रयत्न होणे गरजेचे आहे, कॉपोरेट क्षेत्रातील सीएसआरअंतर्गत वितरीत होणारा निघी या क्षेत्राकडे वळवता आला पाहिजे.



    उत्तर द्याहटवा