मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

सोशल मीडिया आणि किशोरवयीन मुलं

नुकतेच एक सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यात सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या किशोरवयीन मुलींना लवकर नैराश्य येत असल्याचे म्हटले आहे.हे प्रमाण मुलांच्या दुप्पट आहे. सोशल मीडिया आणि नैराश्याची लक्षणे यांच्यावर करण्यात आलेले हे पहिलेच संशोधन असून ई क्लिनिकल मेडिसिन या नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे. लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधकांनी सुमारे ११ हजार तरुणांची माहिती यासाठी अभ्यासली. त्यामध्ये १४ वर्षांच्या मुली सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी दोन पंचमांश मुली रोज तीन तास सोशल मीडियावर घालवत असल्याचे समोर आले आहे, तर या वयाची एक पंचमांश मुले इतकाच वेळ सोशल मीडियावर घालवत असल्याचे समोर आले आहे.

बुधवार, २२ जानेवारी, २०२०

डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या

अलीकडे वेगवेगळ्या व्हटॅमिन्स, कॅल्शियमच्या गोळ्या बिनदिक्कतपणे घेणं सामान्य गोष्ट बनली आहे. किंबहुना, धावपळीमुळे थकवा जाणवतो, चाळीशीनंतर कॅल्शियमची कमतरता भासते. अशा ऐकीव माहितीवरुन काही लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:च मेडिकलमधून गोळ्या आणतात आणि घ्यायला सुरुवात करतात; परंतु संपूर्ण माहितीशिवाय आणि किती आवश्यकता आहे हे न जाणता अशा गोळ्या घेणं लाभदायक ठरत नाही. किंबहुना, त्यांचे दुष्परिणामच दिसण्याची शक्यता असते.

मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

खेळण्यासाठी मैदाने विकसित करा

मुले खेळायचे विसरून गेली आहेत. शहरातील मुले शाळा, विविध प्रकारचे क्लासेस यातच गुरफटून गेली आहेत आणि राहिलेला वेळ मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही यातच घालवत असल्याने ही मुले खेळापासून दूर गेली आहेत. ग्रामीण भागातही कमी जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यांना खेळायला बाहेर काढणे आवश्यक आहे,यासाठी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासन यांनी संयुक्त रित्या मुलांना खेळासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

सोमवार, २० जानेवारी, २०२०

महिलांच्या हाताला काम द्या

आपल्या देशात अजूनही शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योग क्षेत्रात महिला मागेच आहेत. वास्तविक महिला सर्व स्तरावर भक्कम असल्या तर संबंधित कुटुंब प्रगतीपथावर राहण्यास मदत होते. आपल्याकडे अजून ही 18 ते 30 वयोगटातील महिला मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्यातच महिलांना अडकवून सोडले आहे. नुकतेच दृष्टी स्त्री अध्ययन आणि प्रबोधन केंद्र या संस्थेमार्फत देशातील महिलांचे विविध पातळ्यांवर सर्व्हेक्षण करण्यात आले. यात निम्म्या महिला नोकरी, व्यवसाय न करणाऱ्या आहेत. प्रजनन क्षम वय, कौटुंबिक जबाबदाऱ्या अशी विविध कारणे आहेत. रोजंदारीवर जाणाऱ्या महिलांना पुरुषांपेक्षा कमी मजुरी मिळते.मात्र महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असतात.तरीही हा भेदभाव का, असा प्रश्न आहे.

शनिवार, १८ जानेवारी, २०२०

वाढदिवसाला झाडे लावा

अलीकडच्या काही वर्षांत वाढदिवस साजरा करण्याचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र त्याला बीभत्सपणाही येत आहे. तरुण पिढी रस्त्यावर सुद्धा वाढदिवस साजरा करून सार्वजनिक शांतता भंग करत आहे. वास्तविक वाढदिवस साजरा कारणं काही वाईट गोष्ट नाही,पण तो साजरा करताना समाजाला काही उपयोग होईल का,हे पाहायला हवे. आपल्या आयुष्याचे एक वर्ष कमी झाले आहे. हे लक्षात ठेवून आपण समाजासाठी काही तरी करायला हवे,याचे भान यायला हवे. त्यामुळे आपला वाढदिवस एक उपक्रम घेऊन आला पाहिजे. वाढदिवस लक्षात ठेवायचा असेल तर या दिवशी प्रत्येकाने वृक्षारोपण करण्याचा चांगला पायंडा पाडायला हवा. निसर्गाचे तापमान वाढत आहे.'विनाश थांबवा, भूमातेचे तन मन जळते आहे.' या उक्तीनुसार वाढलेल्या तापमानाचा सामना करताना
सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वृक्षारोपण व संवर्धनाची चळवळ निर्माण व्हावी

निसर्ग आपल्याला नेहमी भरभरून  देत असतो. त्यात तो कसलीच कुचराई करत नाही. त्यामुळे आपण जीवन सुसह्यपणे चालले आहे. पण आपण आपला विकास साधत असताना या निसर्गावरच घाला घालत आहे. आपल्या पापामुळे वायू,ध्वनी,जल प्रदूषण भयानक वाढले आहे. याचा फटका शेवटी आपल्यालाच बसत आहे. म्हणजे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. आपल्याला वेळीच सावध व्हायला हवे आहे. वाढत्या आधुनिकीकरण व पाणी प्रदूषण व अन्य कारणांमुळे निसर्गाचा जो समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. त्याला पुन्हा वाटेवर आणण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे  बेसुमार जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे.

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

तानाजी चित्रपट टॅक्स फ्री करा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशात 'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही  हा चित्रपट टॅक्स फ्री करायला हवा. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 'तान्हाजी' चित्रपट हा त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने त्यांची प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी अशी अपेक्षा आहे. त्याचसोबत अभिनेता अजय देवगण यानेसुद्धा 'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी विनंती सरकारला केली होती. 

मंगळवार, ७ जानेवारी, २०२०

दिल्ली कुणाची?

सुधारित नागरिकत्व कायदा, 'एनआरसी' या विषयावरून देशभरात आंदोलने सुरू आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेला हॉल हे ताजे प्रकरण असतानाच दिल्लीची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. मोदी सरकारने देशाची सुरक्षितता, ऐक्य आणि काश्मीर आदी प्रश्न पुढे केले आहेत,मग ती निवडणूक लोकसभेची असो किंवा विधानसभेची. दिल्ली विधानसभा निवडणूकसुद्धा मोदी सरकार याच मुद्द्यावरून लढवणार आहे,यात शंका नाही,कारण त्यांच्याकडे दुसरे प्रश्नच नाहीत. विकासदराच्या गटांगळ्या, वाढती महागाई, बेरोजगारी अशा ज्वलंत प्रश्नांमुळे देशात अस्वस्थता आहे. याकडील जनतेचे लक्ष हटवण्यासाठी मोदी सरकार वेगळेच मुद्दे समोर आणत आहे.

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

यशस्वी होण्याचे नऊ मंत्र

प्रत्येक माणसात प्रतिभेचा राजहंस दडलेला असतो, माणसाने या राजहंसाचा शोध घेतला पाहिजे, तसेच उच्च ध्येय ठेवून कर्तृत्वाने उंच शिखर गाठावे. विकासाच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. गरिबांनी गरीबच रहावे म्हणून समाजात अनेक गोष्टी पेरल्या आहेत. यात अंथरुण पाहून पाय पसरावेत, साधी राहणी, उच्च विचार अशा गोष्टींचा समावेश आहे, परंतु अंथरूण पाहून पाय पसरायला लागतात, तर उद्या दुसरा कुणी तुमच्या अंथरुणात पाय घालेल. त्यामुळे तुम्ही तुमचे अंथरूण वाढवा. साधी राहणी व उच्च विचार हाही बकवास आहे. कुणी पॉश राहतो म्हणून त्याचे विचार वाईट आहेत, असे मानण्याचे कारण नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही एके ठिकाणी म्हटले आहे की, 'ठेविले अनंते तैसेचि राहावे' या उदासिन वृत्तीचा त्याग करण्यास लोकांना प्रवृत्त केले पाहिजे.

लोकसंख्येवर नियंत्रण आणा

1 जानेवारी 2020 या दिवशी आपल्या भारतात 67 हजार 385 मुलांनी जन्म घेतला. ज्या घरात बाळ जन्माला आले,त्या घरात आनंद,उत्साह ओसंडला असेल यात शंकाच नाही. पण देशाचा विचार केला तर मात्र मोठा काळजीचा प्रश्न आहे. ही संख्या सरासरी धरली तर आपल्या देशात वर्षाला 2 कोटी 45 लाख बाळे जन्माला येतात. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्ये इतकी आहे. एका वर्षाला अडीच कोटी मुलांचा जन्म ही काही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब नाही. उलट या नव्याने जन्माला आलेल्या मुलांसाठीच्या संसाधनांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आधीच आपल्या देशात संसाधने,अन्न यांची मोठी कमतरता आहे.

बुधवार, १ जानेवारी, २०२०

ज्येष्ठ राजकारण्यांनाही रिटायर्ड करा


आपला देश तरुणांचा देश आहे. 2021 च्या जणगणनेनुसार देशातील तरुणांची संख्या 51 टक्के होईल, असे सांगितले जाते. 2011च्या जणगणनेनुसार तरुणांची संख्या 34 टक्के होती. इतर देशांच्या तुलनेत आपला देश सर्वाधिक तरुण आहे. चीनमध्ये 21 कोटी तर अमेरिकेत 7 कोटी तरुण आहेत. असे असतानाही आपल्या देशाची सूत्रे ही म्हातार्या राजकारण्यांच्या हातात आहेत. आपल्या देशात 50 ते 60 वयातल्या वृद्धांना तरुण म्हटले जाते. मग म्हातारे कुणाला म्हणायचे हा प्रश्नच आहे. सरकारी नोकरमान्यांना 58 ते 60 वय झाल्यावर सेवानिवृत्त केले जाते. का तर ते काम करण्यास लायक नसतात म्हणून. राजकारणात मात्र वृद्ध मंडळी खुर्चीला चिटकून असतात.या मंडळींना मात्र कसलेच बंधन नाही. खरे तर यांनाही रिटायर्ड करायला हवे. तरुणांच्या हातात सत्तेची, राजकारणाची सूत्रे द्यायला हवीत. ज्यांची संख्या मोठी आहे, त्यांना राजकारणात प्राधान्य द्यायला हवे.ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत, त्या वृद्ध राजकारण्यांना सत्तेची लालसा सुटतच नाही.