शुक्रवार, ३१ जुलै, २०२०
वनस्पती लोण्यावर शासनाचे नियंत्रण असावे
मलेरियावरही लस येण्याची गरज
बुधवार, २९ जुलै, २०२०
रोजगार निर्मितीशिवाय गरिबी संपणार नाही
सोमवार, २७ जुलै, २०२०
लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्थांची गरज
महाराष्ट्राला झालेली भूतबाधा कधी जाणार?
एचआयव्ही'पेक्षाही घातक कावीळ
देशाची प्रगतीच होतेय
काही माणसं आपलं आपलं बघत आहेत, जे पूर्वी चालत होतं. यातही आता वाढच झालेली दिसते. आता तर समाजाचे 'मसीहा' वाढले, तसे फायदा उपटण्यासाठी समाजाची संख्याही वाढली. गरीब,मागास म्हणून घ्याला उच्च समाजही उठून बसू लागले. आपल्या समाजाचा फायदा करून घेण्यासाठी निरनिराळे दबावगट निर्माण करून सरकारी यंत्रणा खिळखिळी करण्याचे उद्योगही काही लोकांकडून चालू राहिले. आपल्या देशात वीज,पाणी,जमीन या गोष्टी सोडून सगळ्या गोष्टी वाढत आहेत. सगळ्या क्षेत्रात प्रगती सुरू आहे. देशाचा व्याप आणि पसाराही चोहोबाजूंनी वाढत आहे. लोकसंख्येचा तर महाविस्फोटच झाला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या 35 कोटी होती आणि आज ती 135 कोटीपर्यंत पोहचली आहे. आणखी काही वर्षांत ही संख्या चारपट होईल.
लोकसंख्या वाढली तसा सोयी-सुविधांचा अभावही वाढला. आजही 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोक शिक्षण, आरोग्य, निवास, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. धर्मविषयक कल्पना अधिक व्यापक आणि उदात्त होत चालल्या आहेत. सुराज्य आणि स्वराज्य या संकल्पनाही अजून स्वप्नवतच आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाली तेव्हा आणि आता यातले आता सारे संदर्भ आणि काही प्रमाणात परिस्थितीही बदललेली आहे. त्यामुळे आज हे सगळे प्रश्न सोडवायचे म्हटले तरी पूर्वीची जुनी, तशीच्या तशी उत्तरं योग्य ठरणार नाहीत. पुरीही पडणार नाहीत. नवनवीन उत्तरं आपल्याला शोधावी लागणार आहेत. सारे संदर्भ बदलले असल्याने त्या संदर्भांचा नव्याने विचार करून या नवीन समस्यांवर आपल्याला तोडगे काढावे लागणार आहेत. आणि हे काम वाटते तितके सोपे नाही. यासाठी सद्याच्या परिस्थितीच्या संदर्भात नवीन उत्तरं शोधण्यासाठी आजच्या स्थितीचे सम्यक, सुस्पष्ट अवलोकन करणं आणि यथायोग्य ज्ञान होणं आवश्यक आहे. हे सारे होण्यासाठी आपल्या मनाची वृत्ती आणि बुद्धीची शक्ती जाणत्या राजाची व्हायला हवी. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे, असे हृदयावर हात ठेवून म्हणतानाच महत्त्वाचे म्हणजे माझ्या देशावर माझे प्रेम आहे, ही भावना आतून उचंबळून आली पाहिजे. तेव्हाच आपल्या देशाची खरी उज्ज्वल प्रगती अनुभवयास मिळणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012
शुक्रवार, २४ जुलै, २०२०
देशाने 'फिनिक्स' झेप घेण्यासाठी...!
बुधवार, २२ जुलै, २०२०
जुनी पेन्शन मिळविण्याचा मार्ग बंद करण्याचा घाट
रविवार, १२ जुलै, २०२०
प्रियांका गांधींना करा काँग्रेस अध्यक्ष
'लॉकडाऊनपेक्षा शिस्त पाळण्याची गरज'
सोमवार, ६ जुलै, २०२०
ई-कचरा वाढ चिंताजनक
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा ई -कचरा वाढतच असून 2018 पेक्षा 2019 मधील ई -कचऱ्यामध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परवानगीने घेतलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे. 'ग्लोबल ई-वेस्ट मॉनिटर'ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2019 मध्ये जागतिक पातळीवर 53.6 लाख मेट्रिक टन ई- कचरा जमा झाला होता. यापैकी फक्त 17.4 टक्के कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया झाली आहे. ज्या देशांमध्ये ई- कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अस्तित्वात आहे, तेथेही पुनर्प्रक्रियेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या ई- कचऱ्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी कल्पनेच्या पलिकडे तर आहेच, पण सध्या ज्या प्रमाणात हा कचरा निर्माण होतो आहे, तो अत्यंत धोकादायक असल्याचे अहवालात म्हटले आहे.