सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

'शतपावली'ने आजारांना लावा पळवून!


अलिकडे महागाई बेसुमार वाढली आहे. याचा परिणाम म्हणजे आपलयाला होणाऱ्या आजारांवरच्या औषधांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकदा डॉक्टरांकडे गेल्यावर पाचशेची नोट कधीआपल्या खिशातून गेली कळत नाही. त्यामुळे आता आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी. मुळात आजार पळविण्यासाठी केवळ औषधांच्या गोळ्या, इंजेक्शन घेणे अथवा बाटल्या रिचवणे गरजेजे आहे असे नाही. कारण कित्येक आजार हे मानवाच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे जडत आहेत. असे असले तरी यावर उपायही आहेत.

 शतपावली हा एक उपाय हृदयरोग, मधुमेह, स्थूलता, ताण आदी आजारांना दूर ठेऊ शकतो अथवा नियंत्रणात आणू शकतो. 'शतपावली' चा मोठा आरोग्यदायी फायदा शरीराला होतो. रात्रीच्या शतपावलीमुळे विशेषतः आपली झोपण्याची वेळ आणि रात्रीच्या जेवणातील अंतर वाढते, जे शरीरासाठी आवश्यक आहे. जीवनशैलीत केलेल्या बदलातूनही आजारांशिवाय सहज, सामान्य जीवन जगू शकतात. कामाचा ताण, रोगट जीवनशैली आणि प्रदूषित अन्नाचे सेवन, व्यायामाचा अभाव अशा विविध प्रकारच्या त्रासांमुळे कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण मिळते.रात्रीच्या शतपावलीमुळे बद्धकोष्ठता कमी होऊन पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.शतपावली आपले शरीर चांगल्या स्थितीत ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. अलिकडे डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा 'गुगल' सर्च करून आजाराची चौकशी करण्याचा व औषधे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टरांविषयी संभ्रम निर्माण होण्याची भीती आहे. आपल्या शरीराची माहिती,नोंदी आपण वेळोवेळी ठेवल्यास आपल्याला आजार का झाला,याचे कारण कळून येईल. आणि त्यावर उपाययोजता येईल. रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने आपली पचनशक्ती तर सुधारतेच पण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून कोविडासारख्या संक्रमणांना दूर ठेवण्यात मदत करते. रात्रीच्या जेवणानंतर चालणं देखील तुमच्या मानसिक आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. रात्री शांत झोप लागते. चालणे तणाव दूर करण्याचा आणि शरीरातील एंडोर्फिन रिलीज करण्यास देखील मदत करते. रात्रीच्या जेवणानंतर चालणं तुम्हाला आनंदी ठेवू शकते. नैराश्यावर मात करता येते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा